क्षीरसागरसाहेब, मी नेहमीच आपले विचार वाचते. कधीकधी अभिप्रायही दिले असतील. पण बरेचदा दिले नसतीलच. आज आवर्जून सांगावेसे वाटले की, " तुम्ही मांडलेल्या गोष्टी माहीत असतातच प्रत्येकाला पण त्यांची जाणीव दबलेली, मनाच्या आत कुठेतरी दडलेली राहते. तुमचा लेख वाचला की किमान तो पूर्ण दिवस अनुषंगिक विचार पिंगा घालत राहतात. निरनिराळ्या प्रकारे स्वतःशीच संवाद घडत राहतो. हे फार महत्त्वाचे वाटते मला आणि ते तुमच्या सातत्याने ( काही वेळा जड वाटणारे असले तरीही.. ) केलेल्या लिखाणाने घडते. "

आजचा विषय जास्त भावला. ' स्पर्श होऊनही अस्पर्शित राहणे ' या मागची कारणमिमांसा... तिचा उलगडा, उदा., अतिशय परिणामकारक रितीने मांडलेत. लेख संग्रही ठेवते आहे. धन्यवाद!