तुमच्या लेखात आणि शब्दात खूप ताकत आहे. शब्दांवर चर्चा करणारे उगाचच विषय भलतीकडे नेतात. असो.
तुमच्या अधीच्या लेखातल्या प्रतिक्रियेविषयी एक शंका होती. कर्माचा सिद्धांत वगैरे काही नसतं अस तुमचं म्हणणं आहे, आणि तसं ते पटण्यासारखं पण आहे. कारण कर्माचा सिद्धांत हा वेळेवर अवलंबून आहे. म्हणजे आधी असं केलं म्हणून तसं झाल. आणि वेळ अस काहीही नाही हे आपण आधिच स्पष्ट केलय.
आता शंका अशी आहे की, क. सि. जर नसेल तर लोकांनी नितीमत्तेने का वागावं? मी एखाद्याचा खून केला काय किंवा थोर समाजकार्य केलं काय दोन्ही सारखच ना?