>मला शाब्दिक चर्चेत खरोखर स्वारस्य नाही कमाल झाली मग वर हे एवढे शब्द कशाला लिहिले?
जोवर आपला अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही आणि त्याला तो बरोबर समजला की नाही ते कळत नाही तोवर अनुभवची देवाणघेवाण कशी करणार? नुसते हातवारे करणार? की नुसते फोटो बघणार?
अनुभव घ्यायला शब्द लागत नसतील कदाचित पण अनुभवाचे आदानप्र्दान करायला किंवा त्यावर चर्चा करायला शब्द पाहिजेतच की.
त्यामुळेच वापरलेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ होणार नाही ही खबरदारी शब्द सुरवातीला वापरणाऱ्याने घ्यायलाच हवी.
= संवादासाठी शब्दांपेक्षाही मोठी गोष्ट आहे, ऐकणाऱ्याची रिसेप्टिवीटी, त्याचं धारणा रहित चित्त आणि सांगणाऱ्याचा अनुभव आणि त्याचा हेतू.
जर सांगणाऱ्याचा हेतू प्रामाणिक असेल, अनुभव प्रगाढ असेल आणि ऐकणारा ओपन असेल तर शब्दातून अर्थ पोहोचतो नाहीतर ऐकणारा नुसते शब्दच धरून बसतो. ज्यांना अर्थ कळलायं त्यांचासाठी माझे शब्द ‘एवढे शब्द’ राहिले नाहीत, ते त्यांना अर्थाप्रत, स्वत:प्रत घेऊन आलेत.
मी इथे एकालाही ओळखत नाही, सर्व संवाद केवळ लेखनातून आहे पण एकाच लेखावर किती भिन्न प्रतिसाद आहेत यावरून मी काय म्हणतोयं त्याची कल्पना येईल:
>आजचा विषय जास्त भावला. ' स्पर्श होऊनही अस्पर्शित राहणे ' या मागची कारणमिमांसा... तिचा उलगडा, उदा., अतिशय परिणामकारक रितीने मांडलेत. लेख संग्रही ठेवते आहे. धन्यवाद!
>हा लेख संपूर्ण डोक्यावरून गेला, एव्हढच कळलं.
>ते सगळे दरवाजे आमच्यासाठी उघडल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अध्यात्म ही खूप अवघड किंवा काही विशिष्ट लोकांसाठीची गोष्ट नसून रोजचं जीवन आनंदी करण्याचा मार्ग दाखवणारा पर्याय आहे, ह्याची जाणीव केवळ तुमच्या लेखांमुळेच होवू शकली. आभार!
>तुमच्या लेखात आणि शब्दात खूप ताकत आहे. शब्दांवर चर्चा करणारे उगाचच विषय भलतीकडे नेतात.
मी माझा अनुभव लिहीतो, शब्दांच्या बाबतीत मी नि:शंक आहे कारण माझा अनुभव आणि हेतूच शब्द घेऊन येतात मला काही प्रयास करावा लागत नाही की आठवावं लागत नाही. ज्यांच्या पर्यंत अर्थ पोहोचत नाही ते बहुदा शब्दवेधी असावेत त्यांना अर्थापेक्षा शब्द प्रिय असावा.
संजय