>तुमच्या अधीच्या लेखातल्या प्रतिक्रियेविषयी एक शंका होती. कर्माचा सिद्धांत वगैरे काही नसतं अस तुमचं म्हणणं आहे, आणि तसं ते पटण्यासारखं पण आहे. कारण कर्माचा सिद्धांत हा वेळेवर अवलंबून आहे. म्हणजे आधी असं केलं म्हणून तसं झाल. आणि वेळ अस काहीही नाही हे आपण आधिच स्पष्ट केलय.
आता शंका अशी आहे की, कर्माचा सिद्धांत जर नसेल तर लोकांनी नितीमत्तेने का वागावं? मी एखाद्याचा खून केला काय किंवा थोर समाजकार्य केलं काय दोन्ही सारखच ना?
= येस! लोकांनी नितीमत्तेने वागावं कारण करणाऱ्याला त्रास होतो म्हणून!
तुम्ही महत्त्वाचे आहात, कृत्य दुय्यम आहे. अज्ञानी लोकांनी आचरणशुद्धीवर भर दिलायं, ज्ञानी म्हणतो, हरेक कृत्यात तुम्ही अस्पर्शित आहात.
आता ही मोठी मजायं, मी अस्पर्शित आहे म्हटल्यावर मी जवाबदारीनं वागतो कारण मग कशाला पंगा घ्या आणि निस्तरत बसा, त्यपेक्षा पेचात अडकूच नका! आपला लाइट मूड कायम ठेवा, गुणगुणत, हसतखेळत, मजेत जगा. ज्ञानी सूज्ञपणे जगतो तो उगीच स्वत:च आयुष्य दुर्धर करून घेत नाही.
संजय