हा माणूस अमेरिकेत हिंदूधर्मावर अत्यंत प्रभावी आध्यात्मिक प्रवचनं देऊन आला पण त्यांना वाटलं की आपल्या बोधवर काशीच्या हिंदूधर्मपीठाचं शिक्कामोर्तब व्हावं. ते जेव्हा तिथे दाखल झाले तेव्हा तिथल्या विद्वानांनी त्यांना एकच प्रश्न विचारला, ‘तुम्हाला संस्कृत येतं? आता रामतीर्थांना संस्कृतमध्ये वादविवाद करता येणं अशक्य होतं कारण त्यांचं प्रभुत्व उर्दू आणि इंग्रजीवर होतं पण मग विषयच संपला! रामतीर्थ इतके विमनस्क झाले की त्यांनी गंगेत जलसमाधी घेतली. आता मी इथे काय जगातल्या कुणाशीही आणि कुठेही विवाद करायला तयार आहे म्हणून बरं नाही तर ही मंडळी एखाद्याला कसं जेरीस आणतील सांगता नाही! बोध भाषेवर अवलंबून नाही आणि शब्दच्छलावर तर नाहीच नाही, तो बुद्धीमत्तेवर, साध्या रिसेप्टीविटीवर, तुमच्या ओपननेसवर अवलंबून आहे.
संजय