1) आपण काहीही केलं तरी हालू शकत नाही या बोधासरशी तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल. अत्यंत नेटानं हा बोध तुम्ही अंतर्तमात स्थिर करा
2) दुसरी गोष्ट, आपण काहीही झालं तरी व्यक्त होऊ शकत नाही, आपण हरस्थितीत अव्यक्त राहतो ही गोष्ट जाणीवेत दृढ करा, कायमची प्रस्थापित करा.
3) काय वाटेल ते केलं तरी आपण अव्यक्त राहतो ही खूणगाठ एकदम पक्की करा.
4) या लेखाचा प्रिंटाऊट घेऊन या तिन्ही गोष्टी तुमच्या अंतर्तमात इतक्या खोल न्या की त्याविषयी तुम्हाला कोणताही संदेह राहायला नको.

हे सर्व माईंड प्रोग्रामींग नाही काय?
तुम्ही जी निराकाराची थेअरी मांडताय, इट कंप्लीटली मेक सेन्स.. नो डाऊट. पण हा बोध नावाचा जो काही प्रकार आहे तो बिजातून अंकुर फुटतो तसा जाणिवेतून यायला हवा ना... मला  अंकुर असं बळजबरीने बीजातून खेचून बाहेर नाही काढता येत. वरील चार वाक्यात तुम्ही जे काही सांगीतलय ते उलट्या क्रमाने होईल असं वाटतं.. म्हणजे
१) आपण काहीही केलं तरी हालू शकत नाही, एकदा का हा बोध झाला कि तो अंतर्मनात कायमचा स्थीर होईल, कारण अंतर्मन आणि बोध दोन्हीनी एकच गोष्ट आहे
२) आपण हरस्थितीत अव्यक्त राहतो ही जाणीव झाली म्हणजे ती कायम जाणवत राहील, त्याकरता प्रयास करावा लागणार नाहि... कारण तीच जाणीवेची परिपक्व अवस्था आहे
३) काय वाटेल ते केलं तरी आपण अव्यक्त राहतो हा अनुभव एकदाका आला कि तो कायम टिकेल, तुम्ही मुक्त झाले असाल
४) अस्पर्षीता कळली कि ती इतकी सच्छ जाणवत राहील कि परत परत उजळणी करायची गरजच पडणार नाही

ही निराकाराची फीलींग पकडायचा मी माझ्यापरीने प्रयत्न करतोय... पण जबरदस्तीने मनात बिंबवुन ते साध्य कसं होईल हे कळत नाहि. यालाच मी माईंड प्रोग्रामींग म्हणातोय... मला ते कसं करायचं ओ का ठी कळत नाहि.