>जर आपले स्वरुप मौन आहे -तर आपण जे काही बोलतो ते आपण बोलतो की मन बोलते?
>जर आपण बोलतो तर आपण मौन कसे?
>आपण बोलतो तेव्हा हे मन बोलते आहेकी आपण हे कसे कळावे? क्रुपया हे कोडे सोडउन मार्गदर्शन करावे? ------------- सतिश
= प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देह असेपर्यंत आपण आकार आणि निराकाराचं मिश्रण आहोत, एकाच वेळी आकार आणि निराकार दोन्ही आहोत, मुळात निराकार असून देहामुळे आकार भासतो आहोत.
आपण (किंवा निराकार) चालत नाही, निराकार कसा चालेल? तो सर्वव्यापी आहे, तो चालूत जाणार कुठे? हाऊ कॅन स्पेस वॉक? जिथे कुठे आपण जातो तिथपर्यंत देहच चाललेला असतो, आपण जसेच्यातसे असतो.
मनाच्या बाबतीतही तसंच आहे, जसे आपण देहाच्या माध्यमातून चालतो तसे मनाच्या माध्यमातून बोलतो. आपली इच्छा नाही आणि शरीर चालायला लागलं असं होत नाही पण मनाच्या बाबतीत तसं नाहीये, मनाची प्रक्रिया अनैच्छिक झालीये, आपली इच्छा नसली तरी मन बोलतं आणि वेगवेगळी दृष्य प्रक्षेपित करत राहतं. हे मनाचं अनैच्छिक होणं आपल्या अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे.
मनाची प्रक्रिया ऐच्छिक करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ऐकणं, ज्या वेळी तुम्ही समग्रतेनं ऐकता तेव्हा मन बोलू शकत नाही, तुम्हाला भोवताली चालू असलेले आवाज (प्रथमच) स्पष्ट ऐकू येऊ लागतात. बोलतांना सुद्धा जेव्हा तुम्ही ऐकायचा सराव कराल तेव्हा तुमचं बोलणं मोजकं, प्रभावी आणि नादमय व्हायला लागतं
संजय