तटस्थता किंवा वैराग्य हा अज्ञानी लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. तुम्ही 'तटस्थ अवलोकनाचा' नाद सोडून द्या.

आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत यापेक्षा "आपल्याला शरीराची जाणीव आहे" (आपण शरीर ‘झालेलो’ नाही) हा विधायक आणि वस्तुस्थितीशी सुसंगत दृष्टीकोन ठेवा. एकदम सोपी गोष्ट आहे, जशी पत्नीची जाणीव आहे, घरात किंवा ऑफिसमध्ये बसल्याची जाणीव आहे तशी शरीराची जाणीव आहे.

आपल्याला जाणीव होते, आपण जाणीव झालेली गोष्ट होत नाही हा बोध तटस्थता आहे. असा बोध तुमच्यात आणि शरीरात, तुमच्यात आणि वैचारिक किंवा भावनिक कोलाहालात, तुमच्यात आणि प्रत्येक प्रसंगात एक 'कधीही न जोडलं जाणारं' अंतर निर्माण करतो, हे अंतर वैराग्य आहे.

निराकाराला काहीही होत नाही हा तुमचा अनुभव होता क्षणी तुम्ही, महाराज म्हणतात तसे "निश्चिंत, आनंदी  आणि उत्साही होता.

एक कायम लक्षात ठेवा साधना हा प्रयास नाही तो योग्य आकलानामुळे आलेला अनुभव आहे. एकदा तुम्ही जाणीवेचं रुपांतर होणं भासमान आहे हे जाणलं की झालं. एकदम साधी गोष्ट आहे, एकदा पत्नी आगदी समोर असताना तुम्ही आपण तिचे पती आहोत या मानसिकतेतून बाहेर आलात की झालात तुम्ही तटस्थ! तुम्ही एखाद्या परस्त्री बरोबर असता तितकेच मजेत तिच्याबरोबर रहायला लागाल. 

एकदा तटस्थता हे तुम्ही आणि जग यातलं न सांधलं जाणारं अंतर आहे हे कळलं की तो प्रयोग तुम्ही मनावर, प्रसंगांवर किंवा शरीरावर कुठेही करू शकता.