मराठीप्रेमीजीना माझा प्रतिसाद चमत्कारिक व आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटला, हे साहजिक आहे. पण मग पुढे ते स्वताच म्हणाले की निरुपमा फार वैयक्तिक अनुभवाविषयी बोलत असतील. हो. मी तसेच बोलत होते. म्हणून मग मी त्याना स्वतंत्र उत्तर दिले नाही. तरीही त्यानी माझ्या प्रतिसादाबद्दल विचार केला, त्याबद्दल आभार. लेखकानी मला समजून घेतले, ह्याबद्दल त्यांचे विशेष आभार. मी हे रसग्रहण जेव्हा वाचले तेव्हा मी असे "गृहित" धरले की लेखक खरोखरच अशा अतीकृष्ण मनाच्या अवस्थेत सापडले असतील. गृहित धरले म्हणून कदाचित हा शब्द वापरत गेले व शेवटी माफीही मागितली. लेखकानी पहिल्या ओळीत वाचकाशी सम्वाद साधला आहे. म्हणून मीही त्यांच्याशी सम्वाद साधला. मी ह्या सन्स्थळावरील लेखकाना आणि वाचकाना माझे सहकारी समजते. जर लेखक सोबतीसाठी देवापर्यंत पोचत आहेत तर माझी भूमिका काय आहे? माणसाचा जन्म आनंदासाठी आहे.माझे सहकारी आनंदात असतील तरच मीही आनन्दात राहू शकते. लेखक प्रेमविषय शोधत आहेत. तो जर नसेल, तर त्यानी बौद्धिक मैत्रीच्या निरपेक्ष नात्याचा स्वीकार करावा असे मी सुचवत गेले. जेव्हा मनुष्य अतीकृष्ण मनोवस्थेत असतो, तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा तेच तेच वेगवेगळ्या प्रकारे सान्गून त्या मनोवस्थेतून बाहेर काढावे लागते, असा माझा अनुभव आहे. हे निव्वळ रसग्रहण होते, लेखकाच्या जीवनात प्रेमविषय आहेच हे वाचून अत्यंत आनंद झाला.
लेखक व मराठीप्रेमीजी ह्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.