आज मी गाणार आहे मस्त गाणे श्रावणाचे
पावसा तू ये न ये मी श्राध्द केले आसवांचे
- मतला छान आहे. एकूण गझल इच्छित परिणाम साधते. मात्र काही द्विपदींतील दोन ओळींचा संबंध विरळ जाणवतो, उदाहरणार्थ मक्त्यात. पहिल्या ओळीत बंडखोरी शोभते का असे विचारल्यावर दुसऱ्या ओळीत रान पेटवावे, का भ्यावयाचे असे कवी म्हणताहेत. हा विरोधाभास कमी अन् आंतरविरोध अधिक वाटतो. त्याऐवजी
बंडखोरी शोभते "निशिकांत" कायम शायरीला! / बंडखोरी शोभते ""निशिकांतच्या काव्यास कायम
रान आता पेटवावे, का कुणाला भ्यावयाचे ?
हे तर्कशुद्ध वाटले असते. वेदनांच्या द्विपदीबद्दलही असेच वाटते. दोन्ही ओळी स्वतंत्रपणे चांगल्या आहेत, पण त्यांच्यातला परस्पर संबंध ओढून ताणून आणलेला वाटतो.