काही ठळक चुका लक्षात आल्या त्या अश्या-
सूचना फारच भाबडेपणाची वाटते.(अजिबात नाही... हा प्रयोग यशस्वी झाला आहे. माझ्याकडे दाखले आहेत. ) (सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे - विलेपार्ले येथिल ऑर्किड हॉटेल (ईकोटेल) जेथे बाग बगीचा, कारंजे, साफसफाई वगैरे साठी साठवलेले पाणी - जे आपण आंघोळ करून वाहून गेलेले असते वगैरे - असे पाणी वापरून कारभार चालू आहे..
एक तर ती मुळीच नावीन्यपूर्ण वगैरे नाही. (अगदी खरे! कारण बर्याच नव्या ईमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपलसरी आहे.. म्हणून केले देखिल आहे) अशा तर्हेच्या सूचना बरेच वेळा अधून मधून डोके वर काढत असतात. त्यातला अव्यवहारीपणा पुन्हा पुन्हा पटवून देत बसण्यापेक्षा लोक सरळ दुर्लक्ष करतात. (लवकरच सगळ्यांचे डोळे उघडतील...)
एव्हढ्या सगळ्या गच्च्यांवरचे पाणी साठवायचे कुठे? (मुळात ज्या ईमारतीसाठी हे करायचे असते तिच्याच खाली तळघरात व्यवस्था करावी) त्यासाठी जागोजागी जलाशय बांधावे लागतील. (आता असलेल्या ईमारतिंसाठी करायचे म्हटल्यास असे करावे लागेल... पण तसे करणे व्यवहार्य नसेल) ती जागा कुठून आणायची? बरे हे पाणी पिण्यायोग्यही नसणार. (वॉटर ट्रिटमेंट प्लांट ने हे पाणी पिण्यायोग्य करून घेणे सहज शक्य आहे) म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नलिकाव्यवस्थेशी त्याचा संपर्क येता नये. नाही तर सारेच पाणी दूषित व्हायचे. इमारतींमध्येच एक तर ते साठवण्याइतकी जागा नसणारच पण समजा जागा असली तरी असे साचलेले पाणी काही महिन्यांनंतर (कारण पावसाळ्यात झाडे शिंपण्यासाठी वगैरे वापरण्याची गरजच नसते.)वापरण्याजोगे तरी राहील का? पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी वापरायचे झाल्यास वेगळी नळव्यवस्था, वेगळा पंप अशी साधने लागतील. (रेन वॉटर हारवेस्टिंग च्या मदतिने आवारातिल बोअरवेल 'रिचार्ज' करता येते हे ठाउक आहे का आपल्याला? ') बहुमजली इमारतींमध्ये अश्या प्लंबिंग चा खर्च किती येईल? (नुसते उन्हाळ्यात दोन महिने जिथे टॅंकर मागवावा लागतो तिथे चौकशी करून पहा.. त्या खर्चा पेक्शा हा खर्च दुरवरचा विचार केल्यास कमी वाटेल) मुंबईत साधारणपणे सत्तर बहात्तर इंच पाऊस पडतो.हिशोबासाठी सहा फूट पकडू या. दोन हजार चौ. फू. गच्चीवरचा हा पाण्याचा सहा फुटी स्तंभ किती लोकांना किती दिवस पुरेल? (म्हणजे १२००० घनफुट) ह्या गच्चीखाली समजा चार मजल्यांवर मिळून प्रत्येकी पाचशे चौ.फू. च्या सोळा सदनिका आहेत. एक घनफूट म्हणजे साधारणतः २.८ लिटर (नव्हे - २८.३१ लिटर) पाणी होते.प्रत्येक सदनिकेमागे दररोज चारशे लिटर पाण्याचा वापर धरला तर हे पाणी त्यांना पाच दिवस (नव्हे - ५३ दिवस) पुरू शकेल. (म्हणजेच पाणी टंचाईचे दोन महिने सुखात जातिल) चारापेक्षा जास्त मजले असतील तर सदनिकांची संख्या जास्त होऊन त्यांना हे पाणी आणखी कमी दिवस पुरेल. वर्षातून फक्त तीन चार दिवस वापर होत असेल तर जलवाहिन्यांचा खर्च कोण कशाला करेल? (पिण्या व्यतिरिक्त - म्हणजेच फ्लशिंगसाठी नक्किच या पाण्याचा उपयोग होतो)