काय व्यवहार्य आहे आणि काय नाही हे परिस्थितिनुरुप आणि प्रत्येक व्यक्तिच्या बाबतीत निरनिराळे ठरेल असे मला वाटते. शब्द ठाऊक आहे का? असे विचारणे सभ्य पणाला धरून नक्किच नाही. अनोळखी व्यक्ती चर्चा करतात पण त्यांच्याशी बोलताना, लिहिताना असे अपमानकारक प्रश्न विचारणे योग्य नव्हे. व्यवहार्य हा शब्दच फक्त माहित असणे पुरेसे नाही.. काय व्यवहार्य आहे आणि काय अव्यवहार्य आहे हे कळणे देखिल गरजेचे आहे. माझ्या मताने हा प्रकार निदान नव्याने बांधल्या जात असलेल्या ईमारतींसाठी नक्किच उपयुक्त, व्यवहार्य आहे यात मला शंका नाही. या विषयाबाबत म्हणाल तर माझ्याकडे पुरावेच आहेत तर अधिक सांगणे न लगे.
असो, या कल्पनेचा काही लोक स्विकार करतील तसेच काही लोक विरोध करतील हे साहजीकच आहे. कुठल्याही नव्या गोष्टीला विरोध हा होतोच... शेवटी काळच ठरवेल कि काय योग्य आहे. यावरून एक गंमत आठवली.. मी असे ऐकले आहे कि मुंबई ठाणे प्रथम रेलवे गाडी धावली तेव्हा म्हणे जनता त्यात बसायला घाबरत होती... खरे खोटे काय कोण जाणे!
शेवटी जाता जाता एव्हढेच सांगायचे आहे कि कुणिही ईमारत बांधायला घेताना या बाबतीत काय करायचे ते आपले आपण ठरवलेले बरे. माझा काही या विषया पैकी निगडीत कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नाही.. त्यामुळे मी या प्रकारचा कट्टर पुरस्कर्ता नाही. मतप्रदर्शन केले एव्हढेच. मला वाद झिंकायचा नाहिये..