अण्णा आणि रामदेव बाबा यांची तुलना एकदम शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्याशी करणे जरा अप्रस्तुत वाटते.....
अर्थात सध्याच्या काळानुसार व परिस्थितीनुसार, कुणीही माणूस कितीही चांगला असला तरी तो टीकेचाच धनी ठरतो.
कुणीही १००% स्वच्छ, चारित्र्यसंपन्न, दिल्या शब्दाला जागणारा, न्यायी, निर्मोही.. असू शकत नाही! सामाजीक परिस्थिती त्याला तसे राहू देत नाही! त्यामुळे आपल्या आदर्शांशी कितपत (म्हणजे टु विच परसेंटेज) हे लोक मिळते जुळते आहेत एव्हढेच फक्त ठरवायचे व त्याप्रमाणे त्यांना स्वीकारायचे (किंवा नाकारायचे! ) हेच आपल्या हाती उरते.