बेसुमारीला बराचसा आळा घालणे,
आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे -
असे मला तरी वाटते .
तुम्हाला ? ? ?

नाही वाटत. वर्षानुवर्षे नित्यनेमाने लोक सभा व विधान सभेच्याच काय, अगदी म. न. पा. च्या निवडणूकीतही मतदान केल्यानंतर आज मला वाटते की मी चूक केली. देशाचा जो ऱ्हास होत होता तो होतच राहिला, माझ्या बोट रंगवून घेण्याने त्यात तीळमात्र फरक पडला नाही. व्यवस्थेला खोलवर लागलेली कीड , तिला पडलेला भ्रष्टाचाराचा विळखा, जराही कमी झाले नाहीत. मागे वळून बघितल्यावर वाटते, उगाच मी वेळ वाया घालवला. त्याऐवजी ते मतदानाचे दिवस इतर लाखो लोकांप्रमाणे मीही सहलीला जाऊन नाहीतर पार्ट्या करून नाहीतर चक्क लोळत घालवले असते तर बरे झाले असते. चार सुखद आठवणी तरी गाठीशी असत्या; हे सिनिसिझ्म, हे वैफल्य तरी नसते.