निदान आज आपण सिंहावलोकन केले तर आपल्याला संतोषजनक बर्याच गोष्टी दिसतील.
लोकसंख्या बेसुमार असली तरीही उपाशी नाही.
दळणवळण क्षेत्रात आपण नेत्रदीपक कामगिरी केली. तीस चाळीस वर्षापूर्वी पी. पी. ट्रंककॉल लावून जनरल पोष्टात तास न तास बसून एखाद्या आजारीपणा अथवा मयतीची बातमी कळवण्याचा अनुभव घेतलेल्या , खांद्यावर भलीमोठी घागर घेउन पाणी भरलेल्या, अथवा भारत -पाक युद्धाच्या बातम्याखरखरत्या सार्वजनिक रेडिओ वर ऐकून आनंदाने बेहोश होणार्या पिढीस त्याचा अनुभव आहे.
आपला देश असाच उत्तरोत्तर प्रगत होवो अशी ईश चरणी प्रार्थना.