सर्वप्रथम रन्गा आपले कौतुक...

मी आजवर अनेक लेख लिहिले वाचले... परंतु तारीख एवढ्या बारकाईने कधीच पाहिली नाही, आपला प्रतिसाद वाचून लक्षात आले, स्क्रोल करून पाहिले तर खरच तारीख  रवि., ०४/०९/२०११ - १९:३४ दिसली  ऑंइंग...कदाचित नुसता लिहून ठेवला असेल आणि आज प्रकशित केला असेल, पण तरीही ही काहितरी तांत्रिक बाब वाटत आहे.... प्रशासक खुलासा करू शकतील,

गंगाधरसुत,

एकदम योग्य विचार मांडला आहे, २० रुपयांची वस्तू ६० ला विकल्यामुळे  श्रीमंत-आणि गरिब ह्यातली दरी वाढत आहे, आणि मग भले खरचं गरीब विक्रेता मरत असेल तरी आम्ही पेपर मध्ये फुले, टॉमेटो रस्त्यावर टाकल्याच्या बातम्या वाचून ब ते झ सगळ्या शिव्या देतो आणि म्हणतो माजलेत हे लोक !

बहिष्काराची युक्ती चांगली आहे पण चक्रम आणि २ नंबरचे पैसे बाळगणारे लोकं, याशिवाय फुकट पैश्याचा रुबाब दाखवणारे लोकं जगात कमी नाहीत.... त्या २-३ धनदांडग्यांमुळे ह्या विक्रेत्यांचे फावते, त्यामुळे आपण १० लोक बहिष्कार टाकतो पण त्याचे पैसे ते ह्या ३ लोकांकडून कमावतात... त्यामुळे त्यांना फरक पडत नाही !

मी माझ्याबाजून ह्या "फुकट" महाग केलेल्या वस्तू कधीच सोडल्या आहेत... बाकी बघू की जनजागृती कधी आणि किती होतीये ते ? :  

पुलेशु,

--

आशुतोष दीक्षित.