सध्या एक वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. शुद्धलेखन तपासणी झाल्यावर (म्हणजे बऱ्याच वेळा झाल्यावर) मी लिखाण नेहेमीप्रमाणे
पाठवले. पण ते प्रकाशित तर झालेच नाही, उलट संपादनाची चौकटच नाहीशी झाल्याने जर चुका असतील तर मी त्या पुन्हा सुधारून
पाठवूही शकत नाही. वेळ मात्र तसाच चालला आहे. पिवळ्या अक्षरातली सूचना मात्र जशीच्या तशीच लिखाणावर अजून आहेच. ती
कशी पुसावी कळत नाही. आता विसावा भाग येणार किंवा नाही याचीच काळजी  वाटते. कृपया उपाय सांगावा. म्हणजे वेळेचा अपव्यय टळेल.
त्यामानाने मीमवर लिखाण लवकर प्रकाशित होते. इथल्या प्रतिसादांचही तितकंच महत्त्व असल्याने यावर उपाय सुचवावा.