देव मानणे म्हणजे पवित्र, अवध्य मानणे असा अर्थ घेते आहे. (नवस वगैरे करणे असा नाही.)

कुठल्या प्रकारचे मांस खावे हा खरे तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तेव्हा या धर्माच्या लोकांनी ते मांस खाल्लेच पाहिजे असे काही म्हणता येणार नाही. खायला हरकत नाही, असे म्हणता येईल. त्या दृष्टीने मनुष्य उत्पादन करीत असणाऱ्या कुठल्याही प्राण्याचे मांस खाण्यावर बंदी नसावी. गाय पवित्र म्हणायची म्हटले तर म्हशीचे काय? म्हैस, रेडा या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते का? (मला माहित नाही.) मासे, कोंबड्या, शेळ्या, गाई, म्हशी या सगळ्या प्राण्यांकडे पीक या दृष्टीने बघावे. म्हणजे आंब्याचे रोप एकदा लावून त्याचे काही वर्षे आंब्याचे पीक व झाडाचे आयुष्य संपत आले कि लाकूड हे पीक तसे.

विनायक व जीएस यांचे समाजसुधारणेसंदर्भातले मत पटले. अर्थशास्त्रीय दृष्टीने विनायक यांचे मत पटले.

काय खावे व काय नाही ही निवड मुख्यतः सांस्कृतिक आहे असे वाटते. (उदा. उपासाला मासे खाणारे बंगाली लोक) पूर्वी केक, बिस्किटे, पाव लपून छपून खायला लागत असे, आता चहा-बिस्किटे हा स्वागताचा सर्वमान्य शिष्टाचार झाला आहे. (राजकारण्यांनी वादाचा मुद्दा बनवला नाही तर) त्या न्यायाने सांस्कृतिक बदलांच्या जोडीने गाईला सर्वसामान्य पशुचा दर्जा गरजेप्रमाणे मिळेल असे वाटते.