द्यायचीच आहे मुलाखात तर बोलू काही तरी गोडधोड..... या सुरात श्री. अवधूत परुळेकर यानी प्रश्नांना उत्तरे न देता अगदी रोखठोकपणे आपली जी मते मांडली आहेत ती अतिशय प्रांजळ असून (विशेषतः 'मराठी भाषेचा वापर... " आणि "मुद्रित माध्यम") वाचताना असे वाटत गेले की अजूनही त्याना बऱ्याच बाबीवर बोलते करणे आवश्यक होते. संकेत स्थळांच्या रुपाविषयी त्यानी मांडलेले मत..... त्यातही तो 'समांतर' चा मुद्दा.... खूपच भावले.

मुलाखतीया उत्तरातील "मराठी  व्यक्तींनी  एकमेकांशी  मराठीतून  संवाद  साधावा  यासाठी  काही  करता  येईल  असे  मला  खरंच  वाटत  नाही. ".. हा भाग पचण्यास काहीसा जड जात आहे. पण असो, हे मत परुळेकरांचे आहे आणि मग ते सर्वांचेच असले पाहिजे असाही काही आग्रह असू शकत नाही.

थोडक्यात मुलाखतकर्तीने तयार केलेली प्रश्नावली संतोषजनक होती असेच म्हणेन मी.

अशोक पाटील