सुरुवातीबाबत काय म्हणायचे ते नीटसे कळले नाही.
उल्लेख केलेली वाक्ये "काय" ह्या शब्दाने सुरू होणे मला हिंदी धाटणीचे वाटते. "काय झालं? ", "काय म्हणता? " अशी वाक्ये मराठीत असतात, पण "काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता"असे सहसा म्हटले जात नाही. (हल्ली मात्र दूरदर्शनवरील "मराठी" जाहिराती व "मराठी" मालिकांमध्ये  ऐकू येते.) "तो फिरता विक्रेता तुझ्याही दारी आला होता काय?"कानाला बरोबर वाटते.

"दारी येणे" खटकण्याचे काहीच कारण नाही.

बाय द वे, हिंदीत बहुधा 'जहाजा'ऐवजी 'कश्ती ' म्हणतील.
जहाज शब्दही वापरात आहे.