लग्नाचे मूळ (किंवा सामाजिक) उद्दिष्ट हे संतती प्राप्त करणे हेच असायला हवे असे वाटते.  बाकी प्रेम, साथसंगत, शारीरिक गरज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नकळतपणे स्वार्थ दडला आहे. (किंवा ह्यातल्या काही गोष्टींना लग्नाचे साईड इफेक्ट्स असे सुद्धा म्हणता येऊ शकेल). खूप सुरुवातीच्या पातळीला जाऊन विचार केल्यास हा मुद्दा पटू शकेल. आज प्रत्येक जण हा विचार लक्षात घेऊन लग्न करत नाही ही वस्तुस्थिती आहे.
प्रेमविवाह असला तरी प्रेमानंतरचे उद्दिष्ट लग्न करून संतती निर्माण आणि संततीला सुसंस्कृत  बनवणे हेच असावे, तर प्रेमविवाह खर्या अर्थाने सफल होईल.
(हा मुद्दा पटणे / न पटणे हा ज्याचा त्याच्या प्रश्न आहे. मला इथे कोणाच्याही टाळ्या नको आहेत, मी कोणता आदर्शवाद मांडत नाहीये. नाही मी कोणती चुकीची गोष्ट लोकांच्या मनात भरायचा प्रयत्न करत आहे. लेखनाचा मूळ सारांश खूप वेगळा आहे. त्यावर चर्चा झाली तर खूप बरे वाटेल.)