प्रत्यक्ष अनुभव आणि पुस्तकी ज्ञान यात फरक असतो. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने आपल्या पुस्तकी ज्ञानानुसार बनलेल्या कल्पना आणि ग्रह आपले आपल्यालाच पडताळून, तपासून घेण्याची संधी मिळते. संदेह दूर होतात. तक्रारखोर वृत्ती कमी होते. ही संधी आपल्याला मिळाली आणि आपण तिचा यथायोग्य उपयोग केला यासाठी अभिनंदन.