पहिल्या काही ओळी - सुमारे ३-४ परिच्छेद - वाचताना लेख रजनिकांतच्या विनोदांच्या वळणाने जाईल अशी शंका आली. कल्कीसोबतच्या मानवाच्या संवादामध्ये एका ठिकाणी   .........."तर ऐक मग... तुला जे जग दिसतं ते मला दिसत नाही. आपल्या जाणिवा वेगळ्या आहेत. ज्या ऐहिक दृष्टिकोनातून सुख-दुःख बघतोस तो मला हास्यास्पद वाटतो. कोणी गरीब म्हणून तो दुःखी असं मला वाटत नाही. "...... या ओळी वाचताना जरा थबकलो, विचारांची एक वेगळी दिशा आपण पकडली आहे असे वाटले... नंतर पुन्हा थोडे भरकटल्यासारखे वाटले. पुढील लेखात काही काही ठिकाणी पुन्हा त्या वेगळ्या दिशेने गेल्यासारखे वाटले. उदा.

"प्रतिष्ठा, लाचारी वगैरे गोष्टी तुम्ही मानवांनी निर्माण केल्यात.... आणि त्यात स्वतःला गुरफटवून घेतलंय.. त्यात माझी काय चूक?

"अपमानास्पद? हा शब्द मला लागूच होत नाही. पुन्हा सांगतो ह्या गोष्टी तुम्ही निर्माण केल्यायत.मी फक्त ह्या सृष्टीचा रचनाकार आहे. मी फक्त प्रक्रिया बनवल्या आहेत ज्यामुळे ही सृष्टी टिकून राहील. जन्म-मृत्यू हा त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे

गरीब श्रीमंत ह्या मानवनिर्मित गोष्टी आहेत. अपंगत्वाबद्दल म्हणशील तर जीव जन्माला येण्याच्या प्रक्रियेतही काही अपघात होऊ शकतात, त्यामुळे तसं होऊ शकतं.. जन्माला आल्यानंतर जसे लोकं अपघाताने अपंग होतात, तसाच हा काहीसा प्रकार आहे

अशा स्वरूपाचे विचार वगळता लेख बराचसा विस्कळीत वाटला. आणि कल्कीचे वर अधोरेखित केलेले विचार पाहिल्यावर सर्वनाशाचा निर्णय घ्यायची वेळ अगदीच खटकली.

असो. काही वेगळ्या विचारांमध्ये गुंतवून ठेवल्याने लेख आवडला