एस जानकी (यांच्याविषयी खरेतर फार माहीत नाही. दूरचित्रवाणीनुसार 'गोपाला गोपाला' गाणे गायलेल्या याच. जर एवढेच असेल तर पद्मभूषण म्हणजे चिकार झाले.) यांनी हा पुरस्कार अशा प्रकारे नाकारून खरंच चुकीचा पायंडा पाडला. या निमित्ताने कनक रेळेंनी घेतलेली भूमिका खरंच सूज्ञपणाची वाटली. "आपण दिलेला पुरस्कार घ्यावा आणि आपले काम करत राहावे", अशा काहीशा अर्थाची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सुशीलकुमारबाबत मात्र खरंच काही करायला हवं होतं असं वाटलं. म्हणजे नियम असतीलही. पण पहिलाच दुहेरी पदक विजेता म्हटल्यावर त्यावेळी कौतुक करण्यात काही विशेष असतं. तो मुहूर्त साधायला हवा होता. असो.