पुरस्कारांच्या निवडप्रक्रियेची चांगली माहिती दिली आहे. या गोष्टी माहीत नव्हत्या.

मला वाटते गेल्या काही वर्षांमध्ये अक्षयकुमार किंवा सैफ अली खान यांसारख्या अभिनेत्यांना पुरस्कार मिळू लागल्याने, वर्षानुवर्षे तपस्या करुन काहीतरी साध्य केलेल्या एस जानकी यांच्यासारख्यांना त्याच रांगेत बसणे कमीपणाचे वाटत असावे. पुरस्कार घेण्याचे आधी मान्य करुन नंतर नाकारणे चुकीचे असले तरी त्यानिमित्ताने त्यांची नाराजी पुढे येते. पुरस्कार नाकारून ही नाराजी सरकार आणि आपल्या चाहत्यांसमोर ठेवण्याची ही एक संधी असते. शिवाय या पुरस्कारांमध्ये कोणताही आर्थिक लाभ नसल्याने पुरस्कार नाकारून आर्थिक नुकसानही होत नाही. थोडेसे बाणेदार असल्याचेही चाहत्यांना दाखवता येते. जर त्यांनी कलेक्टर वगैरे विचारायला आले तेव्हाच पुरस्कार नाकारला असता तर अमुकतमुक कलाकाराने पुरस्कार नाकारला इतपत एका ओळीचीही बातमी आली नसती.

बाकी अपरिपक्वता वगैरे मुद्द्यांशी सहमती आहेच.