पुरस्कारांच्या निवडप्रक्रियेची चांगली माहिती दिली आहे. या गोष्टी माहीत नव्हत्या.
सहमत आहे. आधी संमती घेऊनही ऐनवेळी पुरस्कार नाकारणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा सस्ता प्रकार असला तरी त्यामुळे सरकारी असंवेदनशीलतेचे समर्थन होत नाही. हे विधानसरसकट आणि धोपट असले तरी खरे आहे. काही काही गोष्टी वेळेवर झाल्या तर त्या सार्थकी लागल्या असे वाटते. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' असल्या धोरणाने कलाकारांसारख्या संवेदनशील, मनस्वी, कलंदर वगैरे व्यक्तींना वीट आला तर नवल नाही.  कर्णाने म्हटल्याप्रमाणे पुरस्कार आधीच नाकारला असता तर त्याची कुणी दखलही घेतली नसती. आधी त्याला संमती दाखवून तो जाहीर झाल्यानंतर नाकारणे ही कलाकाराने आपली नाराजी व्यक्त करण्याची पद्धत दिसते. ती चुकीची असली तरी त्याऐवजी त्याला /तिला काय करता येईल याचे उत्तर मिळणेही अवघडच आहे. कलाकाराने सर्वसामान्य माणसाप्रमाणेच व्यक्त व्हावे अशी अपेक्षा करणेही बरोबर नाही. कलाकारांना तेवढे 'पोएटिक लायसन्स' द्यायला हवे.
'मला भारतरत्न द्यायला हवा होता...' अशी मागणी स्वतःच करणे याबाबत बाकी शब्दच खुंटले. ज्यांचाबाबत कमालीचा आदर वाटावा अशा काही लोकांचे उतारवयातील वर्तन पाहून वाईट वाटते. शरीर आणि मन म्हातारे झाले की विवेकाचा बळी जातो की काय? असे असेल तर हे सगळ्यांच्या बाबतीतच का होत नाही?