हर्षल...
कवी ज्यावेळी म्हणतो "अक्षय गाणे".... म्हणजे जे कधीच क्षतीग्रस्त... नष्ट होऊ शकत नाही... आणि पुढे "अभंग गाणे... " म्हणजे कसल्याही विपरित स्थितीतही ह्या गाण्याची मोडतोड होऊ शकणार नाही, ते जसेच्या तसेच राहील.
मात्र चानी प्रस्तुत ओळीतील...."देवाजीच्या दारी आज रंगला अभंग... "
मधील अभंग हा काव्यातील रचनेचा प्रकार असून इंग्रजीत ज्याला 'मेट्रिकल कंपोझीशन' म्हटले जाते त्या गटात येत असल्याने अक्षय-अभंगशी त्याची तुलना होऊ शकणार नाही.