ही मुले संस्कारक्षम वयामध्ये इतकी वर्षे मराठी वातावरणात राहून गेल्यावर त्यांच्या भाषेवर, दैनिक जीवनावर त्याचे काय परिणाम होत असतील ह्याबाबत कुतूहल जागृत झाले. विशेषतः परत गेल्यावर तेथे बोलताना, वावरताना, प्रसारमाध्यमांत लिहिताना, सार्वजनिक ठिकाण मतप्रदर्शन करताना, अनेकदा मराठी शब्द, मराठी वाक्प्रचार, म्हणी, बोधवचने इत्यादी अनेक गोष्टींचा प्रभाव जाणवत असेल का? आजूबाजूच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होत असेल ह्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली.>>>