मला समजलेला लेखमालेचा उद्देश असा - काही पारंपारीक पद्धतीने उपचार करणारे, जे हे समाजसेवा म्हनून करतात, अशा लोकांना या कायद्या मुळे उपचार करता येणार नाही आणि त्यांचे ज्ञान काळाच्य ओघात नष्ट होईल. यामुळे रोगी पारंपारीक उपचारांपासून वंचित राहतील. आपले हे ज्ञान वाचवायचे असेल तर हा कायदा होउ नये.
काही मुद्दे -
१. आमटे कुटूंबीय अनेक वर्ष अशा वैदुं बरोबर लढले. त्यांचा लढा चुकीचा म्हणावा काय?
२. काही लोकांना अनुभवाने थोडे-फार वैद्यकीय ज्ञान येत असते, उ. कंपाऊडर. म्हणून त्यांनी डॉक्टर-वैद्यांची जाग घ्यावी का?
३. समजा काही रोगी अशा वैदूंच्या उपचारामुळे दगावले तर याला जबाबदार कोण?
४. जर कही उपचारांनी रोगी बर होत असेल तर त्यच्यामागे नक्की काहितरी आधार असावा. असा आधार वैदूना माहीत असणे आणि डॉ. ना माहीत नसणे केवळ अशक्य.
५. एक औषध सगळ्यांना सरसकट लागू होत नसते. त्याची मात्रा वय, लींग, असलेले आजार, वजन इत्यादीनुसार कमी-जास्त करावी लागते. त्याचे ज्ञान वैदुंना असेल काय?
अज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान हे धोकादायक असते.