ही कविता प्रकाशित झाली त्याच दिवशी वाचली होती पण वाचल्यावर झालेली प्रतिक्रिया लिहावी की नाही हे ठरवण्यात ५-६ दिवस गेले. शेवटी लिहावीच असे आज ठरवले. तर अशा प्रकारच्या कविता लिहिण्याची परिस्थिती यावी ह्या गोष्टीचा मला मनस्ताप झाला. एक ऐकीव माहितीः एका कुष्ठरोग्यांच्या सुधारकेंद्राच्या उद्घाटनाला महात्मा गांधींना बोलावले असताना ते म्हणाले हे केंद्र बंद करण्याच्या समारंभाला यायला मला आवडेल! त्याच चालीवर म्हणावेसे वाटते की अशा कविता लिहिण्याची वेळ येणार नाही तो सुदिन!
थोडक्यात काय?
बहरण्यास भयभीत झालीत झाडे
प्रभावी कविता!