दिवाळी अंकाचा उपक्रम खंडित झाला ही  गोष्ट एकदा मान्य केल्यावर त्यासाठी आलेले साहित्य एका दिवशी  प्रकाशित करणे हा त्याला पर्याय होऊ शकत नाही या काही  मनोगतींच्या मताशी  मीही सहमत आहे. मुख्य म्हणजे अंकाचे स्वरूप त्यावर संपादकीय समितीने घेतलेल्या परिश्रमामुळे ( ज्यात मुद्रितशोधन, आरेखन, सजावट इ.चा समावेश होतो. ) जे प्रेक्षणीय व अधिक वाचनीय होते तसे या प्रकारच्या प्रकाशनाने होणार नाही यात काहीच शंका नाही.