फारच छान लेख. आपण गंमत म्हणून लिहिले आहे, पण ते पूर्णपणे खरे आहे. ज्योतिषी लोकांना सुरुवाती पासूनच आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही तरी संदेश मिळत असल्यासारखे वाटत असते. मग ते थोडया काळाकरिता अभ्यास करतात. पण त्यातला क्लिष्ट भाग चालू झाला की ते अभ्यास आवरता घेतात. कारण आकडेमोड करूनही त्यांचं भविष्य खरे होत नाही. मग ते अभ्यास पूर्णपणे थांबवतात आणि स्वतःचे आडाखे एखाद्या उपासनेच्या आधाराने व्यक्त करू लागतात. अशी स्थिती बऱ्याचदा आढळते. म्हणून तर असे लेख मनोरंजन करतात. अशा प्रकारच्या आपल्या सर्व लेखनास हार्दिक शुभेच्छा.