झपाटलेली माणसे असेच वागतात. कविवर्य बा. भ. बोरकर यांचे कणकवलीला काव्यगायन होते. तो मॅट्रीकच्या परीक्षेचा शेवटचा दिवस होता. एक चष्मेवाला कवितावेडा विद्यार्थी परिक्षा सोडून या कार्यक्रमाला आला होता. नंतर दहापंधरा वर्षे त्याने परीक्षा दिलीच नाही. जवळजवळ पंधरा वर्षांनी तीन प्रयत्नांनंतर तो विद्यार्थी कसाबसा मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्या विद्यार्थ्याचे नाव आहे चिं. त्र्यं. खानोलकर. 

असो, मला अशी झोकून देणारी, आयुष्य उधळणारी माणसे आवडतात, कथा देखील आवडली.