फक्त पैसे पाठवले की सगळे होते का? नाही. पण पैसे असल्या शिवाय तर काहीच होत नाही. वृद्धांची काळजी घेणार्या गृहात ३५,००० रु महीना एका करता, येवढा खर्च स्वतः निवृत्त झालेल्या भारतीय मुलांना जमण्यासारखा नाही. परदेशात जास्त कमवाणार्यांनाच ते शक्य आहे.
शेवट जवळ आला असताना पोरंबाळं जवळ असावी हे (भारतीय) वाटणं चुकीचं आहे का? नाही. पण शेवटाची सुरुवात व त्या "शेवटा चा शेवट" यात जर पंधरा वर्षांचा कालावधी असेल तर ?
की इथून पुढे मुलं जन्माला घालायची, शिकवायची आणि द्यायची अमेरिकेला धाडून, काही आशा न ठेवता ? प्रश्न भावनिक पातळीवर विचारला आहे. अश्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. समजा एकद्याने उत्तर म्हणून प्रती प्रश्न विचारला - "इथून पुढे मुलांनी जन्माला यायच, शिकायच, आणि बसायच इथेच, आई-बाबांचे डायपर बदलत, काही आशा न ठेवता" तर ? दोन्ही प्रश्न भावनिक पातळीवर, व वैतागाच्या स्वरात आहेत. त्यातून, मुलं अशी अमेरिकेला "धाडून" देता येत नाहीत, टपाल पाठवल्या सारखी. त्या मागे मुलांची प्रचंड मेहेनत असते, व आई-बाबांना
त्याचा अभिमान असतो. परदेशी निघालेल्या प्रत्येक मुलाच्या आई-बापांना हे माहीत असते कि कदाचित आता हे अपत्य आपल्या गरजेच्या काळी आपल्याला जवळ असणार नाही. तरी आपल्या भविष्या करता अपत्याला भारतातच अडकवून ठेवणारे स्वार्थी आई-बाप विरळाच.
पण आईबाबांच्या आजारपणावेळी मात्र नेमके मुलांचे प्रोजेक्ट मध्ये येतात.... विमानाची तिकिटं मिळत नाहीत. तुमच्या ओळखीत कदचित अशी काही उदाहरण असतील. पण उलट उदाहरणे पण भरपूर आहेत. दर वर्षे सर्व सुट्टी व साठवलेले पैसे फक्त भारतात येवून आई-बाबांना भेटण्यात खर्च करणारे पण आहेत. इकडच्या किंवा तिकडच्या, काही उदाहरणांनी काहीही सिद्ध होत नाही.
लग्न, मुलं या पासून नवी पिढी या मुळेच दूर पळत असेल का ? लग्न ही नको आणि जवाबदारी ही नको. अजब लॉजिक. आपण लग्न न केल्याने आपले आई-बाबा, जे आपल्या आधीच जन्माला आले आहेत, त्यांच्या म्हातारपणी त्यांची जबाबदारी कशी काय टळेल ? तुम्हाला बहुतेक म्हणायच होत "आई-बाबांच्या म्हातारपणी त्यांची जबाबदारी घ्यायला लागू नये म्हणून मुलं आई-बाबांच लग्न आणि स्वतःच जन्माला येण, या पासून दूर पळत असतील का?". प्रकाशाच्या वेगा पेक्षा जास्त वेगाने प्रवास केल्यास ते शक्य आहे.