उच्चार गुरुमुखेच  एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहोचताना त्यात प्रत्येक टप्प्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. आणि एकदा बदल झाला की त्याचे पूर्वीचे  स्वरूप कसे होते या बद्दल आपण काहीही अंदज करू शकत नाही.

संस्कृतमध्ये अ-इ-उ-ऋ या स्वरांचे प्रत्येका अठरा उच्चार आहेत, आणि बाकीच्या स्वरांचे प्रत्येकी बारा.  वेदाध्ययन करणाऱ्यांकडून हे उच्चार वदवून घेतले जातात. उत्तर हिंदुस्थानापासून ते अगदी दक्षिणेकडेपर्यंत वेदांच्या अभ्यासाचीच तीच ती पद्धत असते. घनपाठाद्वारे व जटापाठाद्वारे वेदांच्या ऋचांची आवर्तने होतात.  या पद्धतीमुळे मूळ उच्चार टिकून राहिले असण्याची दाट शक्यता आहे.

संगीताचे ज्ञानही एका गुरूकडून दुसऱ्या गुरूकडे संक्रमित होते. तेव्हा काही किरकोळ बदल होत असले तरी मूळ गाभा तसाच राहतो, असे समजले जाते. छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, शिक्षा आणि कल्पसूत्र  ही वेदांची सहा अंगे समजली जातात.  निरुक्तामध्ये शब्दनिर्मिती आणि व्याकरणामध्ये शब्दसंगती येते. उच्चारशास्त्रही त्यात समाविष्ट आहे.  सामान्य लोकांच्या बाबतीत दर बारा कोसांवर भाषा बदलते, पण वैदिक पंडितांमध्ये असे होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

संगीतातील तालवादनात मात्रांचे महत्त्व आहेत. कर्नाटकी संगीतातले गायक मांडीवर थापट्या मारून मारून ताल मोजतात.  गेय कवितेतही मात्रांचे असेच महत्त्व आहे. कृ आणि क्री यांच्या मात्रांत फरक असल्याने काव्यरचनेत  एकाऐवजी दुसरे चालणार नाही.