>ज्यावेळी माणूस मरतो. तेव्हा त्याच्या कर्मांचे भोग कोणी भोगायचे तर त्याच्यावर अवलंबून असलेली संबंधित माणसे भोगतात.

= नाही. सर्व स्मृती मेंदूत असतात आणि तो मृत्यू नंतर (दहनादी क्रियांनी) डिफॉर्मॅट होतो, तस्मात एकाची कर्म दुसऱ्याला भोगायला लागत नाहीत.

>कारण अशी कर्म जर पुढे भोगण्यासाठी साचत गेली तर आत्म्याची प्रगती कशी होणार ? कारण तो नवनवीन  अनुभवांसाठी नव्या नव्या परिस्थितीत जन्म घेत असावा

आत्मा सदैव निराकार आहे, आणि त्यामुळे जन्म-मृत्यूनं अनाबाधित आहे.

>
मृतात्म्याचे जे कर्म भोग त्याला बरोबर नेता येत नाहीत . ते आजूबाजूचा समाज भोगतो....असे फिरणारे बेवारशी विचार त्या त्या विचाराकडे ओढले जात असावेत.

= पहिल्या चुकीमुळे पुन्हा, तदाधारित पुढचं सगळंच चूक!

>
चांगले विचार , शुभ बोलणं (म्हणजे आताच्या पटणाऱ्या भाषेत पॉझिटिव्ह) वाईट संगती पासून दूर राहणं हे आपल्या कर्माची प्रत सुधारण्यासाठी आणी* समाज सुधारण्यासाठी आवश्यक आहे.

= हे एकल विधान म्हणून बरोबर आहे आणि ती उघड वस्तुस्थिती आहे. विचार म्हणजे आत केलेलं कर्म आणि कर्म म्हणजे व्यक्त झालेला विचार.

>थोडक्यात काय तर जे केलं  ते याच जन्मात स्वतः आणि समाजाला भोगावे लागते.

= हा मुद्दा बरोबर असल्यानं सुरुवातीचा मुद्दा चूक ठरतो.

>याच विचारांनी पाहायचे झाले तर जे संत व जीवन मुक्त पुरूष आहेत त्यांच्या कर्मांचा वारसा पण ....  त्यांच्या संपर्कात येणारे वाईट लोक भोगतात.

= कुणाच्या कोणत्याही कर्माचा वारसा उरत नाही त्यामुळे तो भोगण्याचा प्रश्न येत नाही.

>...तरी यावर आपले काय म्हणणे आहे ते लिहावे ही विनंती.

= फुल म्हणणे वरती लिहीले आहे.