प्रतिसादाच्या शेवटी एक स्माईली होता, याचा अर्थ प्रतिसाद पूर्ण पणे गांभीर्याने घ्यायचा नव्हता हे उघडच आहे. पण तो पूर्ण वात्रटपणा पण नव्हता. मागे याच का दुसर्या धाग्या वर संस्कृत संगणका करता अति उपयुक्त आहे वगैरे चर्चा झाली होती. संगणकात शेवटी मशीन लँग्वेज जी असते तीत प्रत्येक instruction ची लांबी अगदी एक सारखी असते. १६ बिट संगणक असेल तर प्रत्येक instruction एक्झक्टली १६ बिट लांबीची असते, एक बिट कमी नाही किंवा जास्त नाही. म्हणून म्हंटले भाषेचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण किती लोकांच्या पचनी पडते ते पहावे. 
लहान मुले बोलायला सुरुवात करतात ते दोन अक्षरी शब्दांनी - बाबा, मामा,
पापा, वगैरे. सर्वच भाषा फक्त दोन अक्षरांच्या शब्दांची का असू नये? आता गहजब हाच शब्द घ्या. यात चार अक्षरे आहेत. का ? हाच शब्द फक्त गह, किंवा गब, किंवा हब वगैरे असा पण ठेवता आला असता. कारण गह, गब, हब, हे शब्द मराठीत नाहीत. हा शब्द चार अक्षरी लांब करून काय साधले? हिंदीत नपुसकलिंग ही संकल्पनाच नाही. गुरुमुखीत जोडाक्षरेच नाहीत. पण या भाषां मधून कोणतेही विचार व्यक्त होण्यास काहीही अडचण येत नाही. (ज्ञानपीठ सुद्धा मिळते). कोणा हिंदी भाषिकाने, विशेष करून साहित्यिकाने, कधी असे म्हंटले आहे, कि "अहो मला एक फार सुंदर साहित्यिक विचार सुचला आहे. पण तो व्यक्त करण्यास नपुसकलिंग जरुरी आहे. ते हिन्दीत नसल्याने मला तो विचार हिन्दीत तरी व्यक्त करता येत नाही." असे कधी कोणी म्हंटले आहे? जोडाक्षरे नसल्याने गुरुमुखी चे काही अडले आहे ? आणि जर नाही, तर नपुसकलिंग ही संकल्पना किंवा जोडाक्षरे ही मराठीतील एक अडगळ आहे, विनाकारण भाषा किचकट करणरी, असे म्हणता येईल का?
तर, मराठी री-डीफाईन करणे हा जरा वात्रटपणा झाला. पण तीन, चार अक्षरे असलेले, तसेच जोडाक्षरे असलेले शब्द का असतात ? या वर काही शास्त्रीय विश्लेशण / विचार अपेक्षित आहे.