मराठी  गीतांमध्ये असा वापर कुठल्या गीतकाराने केल्याचे उदाहरण आहे का?

भाषेचे जुजबी ज्ञान असणाऱ्यालाही चित्रपटातली गाणी म्हणायला 'जड' जाऊ नयेत अशी संकल्पना असणे स्वाभाविक वाटते.

सहज आठवलेली काही मराठी गाणी अशी :

युग यंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे
घाम न आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी... गंगा आली रे अंगणी - ग. दि. माडगूळकर

पान जागे फूल जागे भाव नयनी जागला... चंद्र आहे साक्षीला - जगदीश खेबुडकर

वर ढगाला लागली कळ - पाणी थेंब थेंब गळं - दादा कोंडके.

टीप : येथे दोन अक्षरी असा विचार न करता द्ववयवी (२ सिलबल) असा विचार करायला हवा असे वाटते. शिवाय मराठीत विभक्तिप्रत्यय आणि शब्दयोगी अव्यये मूळ शब्दाला जोडून लिहिली जात असल्याने द्वयववी शब्दांच्या संख्येवर मर्यादा येते.