भारताच्या मणिपूर राज्यातल्या उख्रूल जिल्ह्यात तांखुल नावाची भाषा बोलली जाते. अविनाशच्या बिनीवाले यांच्या 'माय मरो पण...' नावाच्या पुस्तकात तांखुलवर एक प्रकरण आहे. त्या प्रकरणातील काही ङयुक्त वाक्ये :-
१, उख्रूलला पोहोचलो तेव्हा ङचेख मला न्यायला आला होता.
२. थेट तिच्याजवळ जात मी विचारले, "आवा, मारिङ् फाली ? " - मावशी, बरी आहेस ना गं तू ?
३. मध्यंतरी निङतानला एक हरिण मिळाले होते.
४,. कोण नाही म्हणून सांगू ? आओ आहे, अंगामी आहे, माओ आहे, झिलिआङसुद्धा आहे.
बाङलाप्रमाणेच पुश्तू, तांखुल, मैते, आणि कोन्याक या भारताच्या वायव्य-ईशान्येला बोलल्या जाणाऱ्या भाषा संस्कृतोद्भव आहेत, असेही त्या पुस्तकात सूचित केले आहे.