विनायक,

<< राणीचे वय मृत्यूसमयी किती होते हाही वादाचा मुद्दा दिसतो. >>

 विकीपीडियावर मला तरी वय साडे बावीस दिसत आहे.  ही लिंक पाहावी.

दुवा क्र. १

रानी लक्ष्मीबाई (जन्म: 19 नवम्बर 1835दुवा क्र. २मृत्यु: 17 जून 1858) मराठा शासित झाँसी राज्य की रानी और दुवा क्र. ३ की वीरांगना थीं जिन्होंने मात्र 23 वर्ष की आयु में ब्रिटिश साम्राज्य की सेना से संग्राम किया और रणक्षेत्र में वीरगति प्राप्त की किन्तु जीते जी अंग्रेजों को अपनी झाँसी पर कब्जा नहीं करने दिया।

<< इंग्रजांनी तिचा दत्तक वारस मंजूर केला असता तर तिने कदाचित शस्त्र हाती घेतलेही नसते. >>

<< पुनर्विवाहाचा मुद्दा इथे कसा लागू होतो समजले नाही. >>

दत्तक वारस नामंजूर केल्याने तिने शस्त्र हाती घेतले हे आपण मान्य करीत आहातच ना.  पुनर्विवाह केला असता तर दत्तकाचा प्रश्न न उद्भवता स्वतःचा जन्मलेला पुत्रच वारस होऊ शकला असता.  तोही इंग्रज सरकारने अमान्य केला असता तर नव्या राजाला इंग्रजांबरोबर लढायला लागले असते.  इतक्या कोवळ्या राणीवर ही पाळी येऊन अकाली मृत्यू पत्करावा लागला नसता.

<< पुत्र गोद लेने के बाद २१ नवंबर १८५३  को राजा गंगाधर राव की मृत्यु हो गयी। >>

वयाच्या अठराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या महिलेने पुनर्विवाह करणे यात अनुचित काय आहे? राणीचा मृत्यू झाला त्याच वर्षी जन्मलेल्या (१८५८)   महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाकरिता आपले आयुष्य वेचले हा इतिहास सर्वज्ञात आहे.