मतदान न करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. मतदान करन्याची सक्ती असा कायदा अजून तरी झालेला नाही, व तश्या गप्पा होत असल्या तरी तसे विधेयक अजून "पाईप लईन मध्ये" पण नाही.
डी पी यादव यांना पक्षात प्रवेश देण्याचा मी निषेध करतो. झाले समाधान? पण अश्या एक-दोन कृत्यांनी भाजपा मला त्याज्य होत नाही. राजकीय पक्षां कडून धर्मराज युधिष्ठीरा सारखे वर्तन (त्याने पण काही चुका केल्याच) मी अपेक्षा करीत नाही. व तशी अपेक्षा ठेवणे मला राजकीय प्रगल्भपणाचे वाटत नाही. महाराष्ट्रातील असा कोणता नेता आहे ज्याच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणे तर दूरच पण किमान चार्ज शीट तरी दाखल झालेली आहे, व त्याने भाजपात प्रवेश केलेला आहे? निव्वळ आरोप काय, कोणीही कोणा वर ही करावेत. जसे केजरीवाल यांचे खुद्द मोदीं वर भ्रष्टाचाराचे आरोप. सोनिया व राहुल गांधी, ज्यांनी मोदींची व भाजपाची हरप्रकारे नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सुद्धा मोदीं वर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. कारण त्यांना माहीत होते कि तसे केल्यास जनता विशवास ठेवणार नाहीच, व त्यांचे स्वःताचे हंसे मात्र होईल.
अदाणी व अंबानी यांच्या सोबत जवळीक आहे हा "आरोप" तुम्ही अनेकदा केलात. जवळीक म्हणजे नेमके काय ते जरा सांगाल का? अदाणी वा अंबानी म्हणजे दाउद इब्राहीम नव्हे (किंवा ओटावियो क्वात्रोकी पण नव्हे) कि त्यांना भेटणे आक्षेपार्य्ह असावे. उद्योगपती म्हणजे जणू गुन्हेगारच, असे मानण्याचा नेहरुवीयन निर्बुद्धपणा आपण ४५ वर्षे केला. जर काही स्पष्ट आरोप असेल तर तो काय ते सांगा, अन्यथा जवळीक म्हणजे काहीही गुन्हा नाही.
अण्णांनी दिल्लीत अनेकदा तब्येत साथ देईल तेवढ्या दिवसांचे आमरण उपोषण करून पाहिले पण काही साध्य झाले नाही. आता तर उपोषण पण करण्यात काही अर्थ नाही, कारण केजरीवाल व टीवी कॅमेरे दोघांनीही साथ सोडली व (प्रतीजैविकां प्रमाणे) वारंवार वापारून आता त्याचा असर पण होत नाही. काहींनी सशस्त्र क्रांती पण करून पाहीली, पण त्याने ही काही साध्य झाले नाही. माथेफिरू सोडले तर लोकशाही प्रक्रियेत सर्वच जण विषवास व्यक्त करतात. पण तुमच्या मते मतदान करून ही काही साध्य होत नाही. मग तुमच्या मते काय करावे ? फक्त "च् च् च्" करीत बसणे ?