१- "शेतकरी साहित्य" म्हणजे नेमके काय? ज्याचे लेखक शेतकरी आहेत, विषय काहीही असो, ते ? का ज्याचा विषय शेती किंवा शेतकरी आहे, लेखकाचा व्यवसाय काहीही असो, ते ?
२ - तुम्ही स्वतःच असे लिहीले आहे कि या उपक्रमाचा उद्देश "मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी" आहे. म्हणजे शेती किंवा शेतकर्यांचे प्रश्न पुढे मांडण्या करता नव्हे. म्हणजे यातून शेतीचे किंवा शेतकर्यांचे काहीही हित साधण्याचा प्रयत्न नाही. बरोबर?
३ - शेतकरी साहित्य संमेलन नक्कीच होईल. शेवटी, सम्मेलन म्हणजे तरी काय? बोलण्या करता दहा-पंधरा वक्ते व चार-पाच पुढारी; ते ऐकण्या करता हजार-पाचशे श्रोते; व चहा-जेवण वगैरे सोय. यातील कोणतीच गोष्ट फार कठीण नाही. तेव्हां संमेलन नक्कीच होईल. प्रश्न असा आहे कि त्यातून साध्य काय होईल ? त्या करता, काय साध्य अपेक्षित आहे?
४ - या उपक्रमाला "चळवळ" का म्हणायचे? चळवळ याचा सर्व साधारण अर्थ समाजाला
जागृत करून कुठल्यातरी अनिष्ट व्यवस्थेला किंवा प्रथेला उखडून टाकून
काहीतरी बदल घडवून आणणे, असा होतो. असे काही अभिप्रेत आहे का?
५ - ग्रामीण साहित्य चळवळ आधी पासून आहेच. शेतकरी साहित्य व ग्रामीण साहित्य यात नेमका फरक तो काय?