लोकसत्ता २९-१०-२०१४ अग्रलेख मधून

[ देवेंद्र फडणवीस यांची] पदोन्नती महत्त्वाची ठरते. दिवंगत वडिलांची आमदारकी वगळता फडणवीस यांना राजकीय वारसा नाही. त्यांच्या मागे ना कोणता उद्योगसमूह ना साखर कारखाना वा ना एखादी बँक. चांगल्या अर्थाने मध्यमवर्गीय मूल्ये मानणाऱ्या एका साध्या घरातील तरुणाने राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचावे हा महाराष्ट्रात अजूनही जिवंत असलेल्या सामाजिक अभिसरणाचा पुरावा मानावयास हवा. फडणवीस उच्चशिक्षित आहेत आणि अर्थकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. महाराष्ट्राचे काय चुकले याबाबत त्यांचे निदान अचूक आहे. विरोधी पक्षनेता या भूमिकेतून या आजाराचे प्रामाणिक निदान त्यांनी केले. आता मुख्यमंत्रिपदावरील नियुक्तीमुळे या आजारावर तितकाच प्रामाणिक उपचार करावयाची संधी त्यांना मिळाली आहे. ती ते दवडणार नाहीत, अशी आशा करावी असे त्यांचे आतापर्यंतचे तरी राजकीय वर्तन राहिलेले आहे.

निवडणूक प्रक्रियेतून काही चांगले घडू शकते या वर आता तरी तुमचा विश्वास बसला का?