आततायी, अप्रस्तुत, आणि कर्कश लेख. साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे ज्याने कुणी हे म्हंटले त्याने साहित्य सम्मेलना वर टीका केली आहे, साहित्य निर्मीती वर नाही. म्हणून महाराष्ट्रात खूप रिकामटेकडे साहित्यिक आहेत. . . साहित्यकृती लिहिणाऱ्यांना भरपूर वेळ होता म्हणूनच त्या लिहिल्या गेल्या. . . . प्रकाशक व विक्रेते हे तर सर्वाधिक रिकामटेकडे आहेत. वगैरे सर्व टीका अप्रस्तुत आहे. हल्ली साहित्य सम्मेलनांचे स्वरूप बदलले आहे, त्यात साहित्या वर चर्चा कमी व राजकारणी लोकांचे मिरवून घेणे अधिक, असे झाले आहे. टीका सध्याच्या सम्मेलनांवर आहे, १८७८ किंवा १९६४ काळातल्या सम्मेलनांवर नाही. हल्लिच्या साहित्य सम्मेलना वर टीका करणारे ते जे कोणी असतील (नांव उघड करायला काय अडचण होती ? ) ते एकटे नाहीत. अनेक वर्तमान पत्रातून अग्र लेखातून पण या वर भरपूर टीका होत असते. तेंव्हा साहित्य सम्मेलनाच्या हितचिंतकांनी ही वेळ का आली या वर विचार करावा.