मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण आपले परीक्षण मात्र अतिशय उत्तम वाटले. अशा प्रकारची परीक्षणं पेपरात का
येत नाहीत कुणास ठाऊक. तिथे निर्मात्याला स्टार मिळवण्याची घाई असावी असे वाटते. काही असो पण परीक्षण फारच आवडले. सावरकरांवर
उलट सुलट (काही अमराठी पुस्तके वाचली आहेत त्यावरून) लिखाणही बरेच झाले आहे. मग पुन्हा त्याच विषयावर चित्रपट काढण्याचं कारण काय ते समजलं नाही. आजकाल मराठी भाषा चांगली येणं , हे फारसं महत्त्वाचं नाही असं बऱ्याच लोकांच्या वागण्यावरून ध्वनित होतं. तसं बोलायला हवच असं नाही. तरीसुद्धा अशा परिस्थितीत या चित्रपटाचे प्रयोजन कळत नाही. सावरकर मराठी भाषेचे अभिमानी होते. जर काढायचाच होता तर त्यांच्या आयुष्यातल्या गाजलेल्या घटनांवर तरी चित्रपट काढायचा होता. पण तसे दिसत नाही. असो. परीक्षण आवडलं.