आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पात्र आपल्याला ओळखीची वाटतात याचाच अर्थ कथेत आपल्याला 
रस निर्माण झाला. नियमित प्रतिसादाबद्दल आभारी आहे व त्यामुळे मला  उत्तेजन मिळाले. सदर कादंबरी लिहिताना बऱ्याच अडचणी आल्या. 
कधी कधी वीज मंडळ मेहेरबानी  करीत असे , तर कधी संगणक आणि घरची माणसे, त्यामुळे काही भागातलं अंतर जास्त झालं, त्याबद्दल क्षमस्व. 
तरीही आपण नियमित वाचलंत . याचं आश्चर्य आहे. कादंबरीचा शेवट काही वाचकांना विचारला आणि मगच केला. त्यांच्या म्हणण्यानुसार 
एवढा त्रास  भोगल्यावर काकांचं आयुष्य चांगलच जायला हवं. मलाही ते पटलं. तसंही अडकलेल्या माणसाला जगावंस वाटावं असा शेवट 
आवश्यक आहे. अन्यथा शोकांत करणं सोपं असतं. त्यामुळे असा विचार करणं मला जरूर होतं वाचणाऱ्या सर्वांचाच मी आभारी आहे. काही चुका 
असल्यास जरूर  दाखवाव्यात, म्हणजे निदान प्रती काढल्यावर मला त्या शक्य असल्यास दुरुस्त करता येतील. नाहीतरी प्रकाशकाला देताना 
चुका दुरुस्त कराव्याच लागतात.