शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते पिकवून उरलेला माल 'योग्य भाव' येत नाही तोवर विकणार नाही असे ठरवू शकत नाही का? याचे उत्तर नाही असेच आहे कारण त्याला
- किराणा दुकान/कृषी केंद्र/कापडाचे दुकानाची उधारी फेडायची असते.
- सावकार आणि बँकांचे कर्ज चुकता करायचे असते.
- मुलाला शाळेचे पुस्तक घ्यायचे असते
- घरावरचे फुटलेले कवेलू बदलायचे असते.
आणखी लिहू?