खरंतर नट काय किंवा लेखक काय त्याच त्याच वर्तुळातले असल्याने प्रेक्षकांना नवीन काही मिळणं कठीण आहे.
कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात वर्तुळाबाहेरील माणसाला हेतुपुरस्सर संधीच दिली जात नाही कारण श्रेष्ठ आणि योग्य जे काही निर्माण करतो तो फक्त आमचाच गट करतो. बाकी लोकांची साहित्य किंवा कला विचारात घेण्याची या लोकांना गरजच वाटत नाही. आणि बाहेरील माणसाला गरज असेल तर श्रेष्ठत्वाचं प्रमाण पत्र देणारे हेच असल्याने समाजातल्या विशिष्ट गटालाच प्राधान्य देण्यात येते. मग गटामध्ये वर्षानुवर्षे मांडी घालून बसलेल्यांची क्षमता कमी होत गेली आणि पुढे नाहिशी झाली तरी तो त्या गटाचा सभासद असल्याने त्याची कलाकृती समाजावर लादली जाते. म्हणजेच वर्तुळ बदललं तरच वेगळं सापडेल किंवा तुम्हाला तुमची आणि तुमच्यासारख्यांची कलाकृती समाजापुढे मांडायची असल्यास नवीन वर्तुळ निर्माण करा म्हणजे नवीन करमणूक तयार होईल. नाहीतर बसा यांच्याच कलाकृतींना टाळ्या वाजवीत आणि पारितोषिकं देत. निदान मला तरी असं वाटतं.