कथा उत्तम आहे ह्यात शंका नाही.
मात्र सुरवातीपासून का कोण जाणे ही कथा एखादी धक्कांतिका निघते की काय असे वाटले होते. (कदाचित नवरे, काळे, मतकरी ह्यांच्या कथा आठवल्यामुळे असेल. )
असा शेवटही मनात आला होता.... 
"इथे काही महिन्यांपूर्वी खेळणी विकणारे लोक बसले होते ते कुठे गेले? "
"केव्हाच गेले इथून ते. आता कशाला थांबतील ते? त्यांना त्या शो-पीस बिझनेसवाल्या मॅडमची ऑर्डर मिळाली ना एकदम बल्कमध्ये ..... "