केदारजी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. असं म्हणतात की जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा कर्ण ७१ वर्षांचा होता. या प्रमाणात भीष्म किती वयाचे असतील? पूर्वीच्या लोकांचं खाणं हे भेसळीचं नव्हतं त्यामुळे त्यांना आयुष्य पण भरपूर असायचं आणि ताकदपण. त्यामुळे बाजीरावाची तलवार ४० किलोची असू शकते. अगदी महाभारताच्या काळात जायची गरज नाही आपल्या  आज्या पणज्या आठवल्या तरी कळेल की त्या जी कामं करत होत्या ती आज कोणाला जमत नाहीत. एकतर साजुक तुपाचे पदार्थ खाल्ले जात. वनस्पती तूप नाही. उपास म्हणजे अगदी निर्जळीच असायचे. उगीच साबूदाण्याची खिचडी आणि तत्सम पदार्थ खाल्ले जात नसत. आता माणसाचं साधारण वय ८०- ८५ असतं. पण अवस्था कशी असते त्यांची ? फारच थोडे लोक या वयात हिंडते फिरते असतात.